कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणजेच तुकाराम मुंडे यांची यशोगाथा …

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील दोन बंधुंची ,अधिकाऱ्यांची अतूलणीय यशोगाथा ! बीड तालुक्यातील पिंपळनेर पासून काही अंतरावर असलेल्या ताडसोन्ना या गावातील हरिभाऊ मुंढे व त्यांच्या पत्नी आसराबाई यांनी आपल्या अल्प शेती म्हणजे सहा एकर एवढी शेती करत असतांना मुलांना शिक्षण देऊन दोन्हीं मुलांना जिल्हाधिकारी पदापर्यंतचे शिक्षण देऊन त्यांना कर्तव्य दक्ष अधिकारी घडवले. गोरगरीबांची मदत शेतकरी बिकटप्रश्न कसेकमी वेळात लावता येतील यासारखी समाजकार्य हे आपल्या पदातून घडवण्यांची प्रेरणादेत मुंढे परिवारांनी मोठ्या मुलाला उपजिल्हाधिकारी तर लहान मुलाला कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी घडवण्याचे महान कार्ये या शेतकरी कुटुंबीयांनी केल्याचे आपणास पाहावयास मिळेल.

अशोक मुंढे व तुकाराम मुंढे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण ताडसोन्ना येथे झाले.महाविद्यालयाचे शिक्षण बीडच्या बलभिमच्या कॉलेजात अशोक मुंढे यांनी आपले शिक्षण पुर्ण करत औरंगाबाद, गंगाखेड, पुणे मुंबई येथे कार्य केले. तर तुकाराम मुंढे यांनी औरंगाबाद येथे बी ए इंग्रजीत व नंतर एम.ए राज्यशास्त्रात केल्यानंतर मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये काहीं काळ प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यावर देगलूर,बार्शी येथे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य केले.नागपूर येथे सीईओ म्हणून काही वेळ कार्य केले.

गरीब परिस्थितून त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंतच्या सर्व समस्या माहित असल्या कारणाने जालणा,सोलापूर येथील अधिकारी म्हणुन त्यांची वेगळीच ख्याती असल्यामुळे तेथील कार्यकाळ खुपच वादग्रस्त ठरला. कुठल्याही अमिषाला ,राजकारणी दबावाला बळी न पडता जनहिताचे प्रश्न तात्काळ निकाली लावण्याच्या त्यांच्या कृतीने तेथील जनतेचे ते आदरनीय अधिकारी बनले होते. त्यामुळे ज्यावेळी त्यांची बदली झाली त्यावेळी जनता रस्त्यावर उतरली होती. मित्रहो, अशा अधिकाऱ्यांना एक तर बदली मिळते नसता त्यांचे पद बदलत असते .

अशा या पदाधिकाऱ्यांची बदली ही नवी मुंबई या ठिकाणी झाली.आपल्या कर्तव्यदक्ष कार्यामुळे त्यांनी त्याठिकाणीही राजकीय दिग्गजांना हादरे बसवले. परंतु त्याही ठिकाणाहून त्यांची बदली झाली याही वेळी मोठे वादळ नवी मुंबईत निर्माण झाले होते. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल शासनालाही घ्यावी लागली. तुकाराम मुंढे संध्या हे पुण्याच्या मनपाच्या परिवहन सेवेत कार्यरत असून अतिशय शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर म्हणून प्रशासन सेवेत त्यांची ख्याती,दरारा आहे. त्यांच्या नावाची धास्ती राजकीय लोकांना बसते.

अशा प्रकारे मुंढे शेतकरी कुटुंबियांनी काबाड कष्ट करून शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आपल्या मुलांना चांगले संस्कार देत कर्तव्यदक्ष अधिकारी बनविण्याचा मोठा मान या मुंढे गरीब कुटुंबियांनी मिळवला असून सध्या ते गावात राहत नाहीत. त्यांनी स्वःताची शेती बटईने दिली आहे. तुकाराम मुंढे गावात आले तर ग्रामसभा घेऊन गावातील लोकांच्या अडचणी मार्गी लावतात. अशाप्रकारे अशोक व तुकाराम मुंढे यांनी संस्कार शिक्षण यांच्या बळावर महत्त्वाचे पद मिळवून समाजाचे समाजहित कार्य करून आपले व आपल्या कुटुंबाचे नावलौकिक केले.



कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणजेच तुकाराम मुंडे यांची यशोगाथा … कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणजेच तुकाराम मुंडे यांची यशोगाथा … Reviewed by yogi on November 06, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.